शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
2
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
3
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
4
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
5
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
6
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
7
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
8
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
9
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
10
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
11
भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
12
सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
13
Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
14
भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
15
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
16
Winter Recipe: हाय-प्रोटिन 'बाजरी मुंगलेट': थंडीत वजन कमी करण्यासाठी आणि नाश्त्यासाठी सर्वोत्तम पौष्टिक रेसिपी!
17
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
18
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
19
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
20
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रावरील उपसाबंदीचे अग्निदिव्य पाणी गुरूवारी सोडणार : तारेवरची कसरत करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:37 IST

दत्तात्रय पाटील।म्हाकवे : झुलपेवाडी धरणातून उद्या, गुरुवारी चिकोत्रा नदी मध्ये सहावे आवर्तन देण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे. परंतु, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची वाढती मागणी पाहता पाटबंधारेला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या, ४२५ एमसीएफटी इतका पाणीसाठा असून, शेतीसह पिण्यासाठी दोन आणि जूनमध्ये केवळ पिण्यासाठी एक ...

ठळक मुद्देपाटबंधारे विभागाला पाणीपुरवठा करताना

दत्तात्रय पाटील।म्हाकवे : झुलपेवाडी धरणातून उद्या, गुरुवारी चिकोत्रा नदीमध्ये सहावे आवर्तन देण्याच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाने तयारी केली आहे. परंतु, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची वाढती मागणी पाहता पाटबंधारेला पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या, ४२५ एमसीएफटी इतका पाणीसाठा असून, शेतीसह पिण्यासाठी दोन आणि जूनमध्ये केवळ पिण्यासाठी एक आणि पावसाने ओढ दिल्यास आणखी एक आवर्तन देण्याचे नियोजन आहे. मात्र, उद्या सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावर पुढील पाण्याचे नियोजन अवलंबून आहे. त्यामुळे अवैध पाणी उपसा रोखण्याचे अग्निदिव्य पाटबंधारेसह वीजवितरणच्या अधिकाऱ्यांना पार करावे लागणार आहे.

चिकोत्रा (झुलपेवाडी) धरणात यंदा केवळ ९४० एमसीएफटी (६२%) इतका अल्प पाणीसाठा झाला. या अत्यल्प पाणीसाठ्यावर चिकोत्रा खोºयातील ३५ गावांतील शेतीसह नागरिक अवलंबून आहेत. उपलब्ध पाणीसाठ्यातून शेतीसह पिण्यासाठी आठ आवर्तने देण्याचे नियोजन केले होते. मात्र, पहिल्या चार ते पाच आवर्तनापर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी उपसा झाल्याने अंतिम टप्प्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या, चिकोत्रा खोºयात पाणीटंचाईचे ढग गडद होत आहेत.

धरणात उपलब्ध पाणी पाहता ७०० एकर बागायती क्षेत्र असणे आवश्यक असताना येथील शेतकºयांनी तब्बल सुमारे २१०० एकर इतक्या मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले. तसेच, नदीमध्ये पाणी साठ्यासाठी मोठमोठे खड्डे काढण्यात आले. तसेच, वाळू उपसाही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. परिणामी, नदीत सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचण्यासाठी जादा वेळ लागत आहे. दरम्यान, १२ ते २१ एप्रिल या कालावधीत चिकोत्रा नदीकाठावर उपसाबंदीचा आदेश काढून पाटबंधारे विभागाने नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे....तर पुढील पाणी बरगे काढूनचउद्या, गुरूवारी सोडण्यात येणारे आवर्तन हे १२५ ते १३० एमसीएफटी पाण्यात पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी उपसाबंदी आदेशाचे पालन होण्यासाठी शेतकºयांसह नदीकाठावरील ग्रामपंचायत पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पाटबंधारे व वीजवितरण अधिकाºयांना सहकार्य करणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हासह अवैध पाणी उपसामुळे या नदीवरील शेवटच्या बंधाºयापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाणार आहे. याचा थेट परिणाम पुढील आवर्तनावर होणार असून, पुढील पाणी सर्वच बंधाºयांचे बरगे काढून सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट निर्देश पाटबंधारेच्या अधिकाºयांनी दिले आहेत.आतातरी डोळे उघडणार काय ?चिकोत्रा खोऱ्यात पाणीटंचाईची जाणीव असणाºया आणि उपसाबंदीतही शेतीला पाणी देण्यासाठी बड्या शेतकºयांनी कमी पाणीपरवाना असताना जादा क्षमतेच्या विद्युतमोटारी, सिंगल फेजवर चालणाºया मोटारी बसवून पाणी उपसा केला. आता या क्लुप्त्याची माहिती प्रशासनापर्यंत आली आहे. त्यामुळे आता याबाबत ठोस पावले उचलून कारवाई होणार का? की ये रे माझ्या मागल्या.. हाच कित्ता अधिकाºयांकडून गिरवला जाणार, असा सवाल चिकोत्राच्या शेवटच्या टोकावरील गावकºयांतून उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणwater transportजलवाहतूक